.कोणी काही सांगावं, कोणी काही ऐकावं. सांगणारा बेचैन हवा आणि ऐकणाराही तितकाच आतूर.ही बेचैनी, ही आतूरता घडवून आणते मग, खरा संवाद...!! या सवांदाला ना भाषेची गरज असते, ना शब्दांची. हा संवाद निखळ असतो, प्रवाही असतो, चैतन्याने अगदी ओतप्रोत भरलेला असतो कड्यावरून बेफाम कोसळणार्या, दिशा मिळेल तिकडे वाहणार्या, खळाळणार्या झर्यासारखा. भाषेला शब्दात कैद करून, त्यावर अलंकारांची बोजडं चढवून त्यातल्या निरागसतेला पुर्णपणे संपवून होतं फक्त, बोलणं, हा तो संवाद नसतोच. संवादाला सिमा नसते, सरहद नसते, बंधनं नसतात. संवाद मोकळा असतो, असिम असतो, शाश्वत असतो. ढगांच्या गडगडाटाने पृथ्वीला आलेला शहारा संवाद असतो. विरहाने खवळलेल्या प्रचंड, प्रेमातूर लाटांनी किनार्याला कवेत घेताना केलेलं तुषारमीश्रीत भाषण संवाद असतो. पानगळीने शिणलेल्या, वसंतपालवीची वाट पाहणार्या, वैशाखवणव्यात कण-कण जळणार्या निष्पर्ण झाडांशी त्या घोंघावणार्या वार्याचा आपूलकीचा, सहानुभूतीचा सहवास संवाद असतो. त्या नवजात अजाण बालकाच्या निरागस डोळ्यातला दुध पीताना दाटलेला कृतज्ञता भाव संवाद असतो.
संवाद असिम असतो, निरामय असतो, अजरामर असतो, कधी
अकल्पीत पण कधी सगळ्यात जास्त परिचीतही असतो संवाद.
(क्रमश:)
~काव्याकाश